Shri Bhargav Fibres

© २०१३ श्री भार्गव फायबर्स                                                                                                                                                  

मुख्य पान आमच्याबद्दल तंत्रज्ञान उपयोग संपर्क

काढणी

महाराष्ट्रातील पावसावर पोसलेल्या बांबूंना साधारण जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात खालच्या कंदांपासून नवे कोंब फुटू लागतात. महाराष्ट्रातील बहुतेक बांबू हे एकाला एक चिकटून दाटीवाटीने बेट किंवा रांजी बनवतात.

 

असे बेटात वाढलेले बांबू साधारण तीन पावसाळ्यानंतर वापरण्या योग्य बनतात. अशा तीन वर्षांनी खडलेल्या बांबूंना कीड किंवा रोगाचा विशेष त्रास होत नाही.

 

जरी बांबूच्या बेटाच्या मध्यभागातून बांबू काढणे अवघड असले तरी त्यासाठीही काही पद्धती वापरता येतात. बांबू साधारण पहिल्या पेराच्या वर कापला जातो. ह्यामुळे उरलेल्या बांबूच्या कापलेल्या भागातून काहीही रोग मुळाकडे शिरत नाही.

 

महाराष्ट्रातील बांबू जाती (.pdf)

Please download adobe Acrobat Reader® to view the list of Bamboo Species in Maharashtra